उद्योग व व्यापार चळवळीतील सहभाग
सन 1988:- संचालक, सांगली चेबर्स ऑफ कॉमर्स
सन 1989-91:- उपाध्यक्ष, सांगली चेबर्स ऑफ कॉमर्स
सन 1992-99:- अध्यक्ष, सांगली चेंबर ऑफ कॉमर्सया अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत व्यापारी व उद्योजकांवर होणा-या अन्याय थांबविण्यासाठी अनेक चळवळी उभारल्या या 85 वर्षाच्या महाराष्ट्रातील जून्या व्यापारी संघटनेच्या गेल्या 82 वर्षातील सर्वात तरुण वयाचा अध्यक्ष होण्याचा मान. सांगली जिल्हयातील व्यापारी वर्गाचे यषस्वी संघटन. या जिल्हा पातळीवरील संस्थेषी तालुका पातळीवरील व्यापारी संघटनासहीत एकूण 27 संघटना सलंग्न. राज्य व्यपारी परिषदेचे 3 वेळा यषस्वी संयोजन.
सन 1987:- जकात विरोधी आंदोलन निमित्त संपूर्ण जिल्हयातील संघटना एकत्रीत करुन् उपोषण, मोर्चा, सायकल मोर्चा काळया फीती लावून मूक मोर्चा व्दारे जनजागृती
सन 1990:- शासनाने गुळावर सेल्स टॅक्स बसविला त्या विरोधात सांगली जिल्हयातील गुळ व्यापार 21 दिवास बंद आदोंलन. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात फक्त सांगली बाजारपेठेत गुळाची आवक होती. संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन तीव्र झाले. शासनाने विधानसभेत पास केलेला कायदा विधानसभेत मागे घेतला.
सन 1990:- सांगली शहरातील पूरामुळे दोन हजार लोकांचे जनजीवन विस्क्ळीत झाले होते. अशावेळी त्यांना तांदूळ व डाळ पूरविणे जेव्हा जीवनावष्यक वस्तूंच्या किंमती आकाशाला भिडल्या तेव्हा चेंबर ऑफ कॉमर्सने रास्त भाव दुकानामार्फत या वस्तु पुरविल्या.
सन 1992:- राज्य व्यापारी परिषदेचे 3 वेळा यषस्वी संयोजन या प्रसंगी प्रमुख पाहूणे अर्थराज्यमंत्री अरुणभाई गुजराथी हे होते.
सन 1993:- कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातील जाचक तरतुदी विरोधी आंदोलनाचे जिल्हयातील यषस्वी नेतृत्व. सातारा येथील परिषदेमध्ये राज्याचे सहकारमंत्री मा. अभयसिंहरोज भोसले यांचे उपस्थित हा प्रश्न जोरदार पणे मांडला व त्याचवेळी मा. सहकार मंत्र्यानी या जाचक तरतूदी रदद् केलयाची घोषणा केली.
25 नोव्हेंबर 1994:- राज्य व्यापारी व उद्योजक भव्या परिषद कृष्णा व्हूली व चेंबरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेस पाच हजार व्यापारी व उद्योजक उपस्थित. तत्कालीन मुख्यमंत्री मा. षरद पवार यांचे उपस्थितीत ही परिषद संपन्न झाली. मा. मुख्यमंत्र्यांनी शासनाचे व्यापार धोरण जाहीर केले.
सांगली जिल्हयात 4000 एकराची MIDC ची मागणी. मा. नामदार शरद पवारसाहेब यांनी MIDC उभारणीबाबत घोषना.
महाराष्ट्रातील निरनिराळया ठिकाणी वेळोवेळी होणा-या परिषदामध्ये व्यापा-यांचे प्रश्न तळमळीने मांडणारा प्रमुख वक्ता म्हणून सहभाग.
ऑगस्ट 1994:- सांगली शहरातील जकात ठेकेदारांची अन्यायकारक वसुली बंद पाडली. या प्रसंगी शहरातील व्यापा-यांच्या भव्य मोर्चाचे आयोजन
सन 1994:- सांगली मार्कट यार्डात बेदाण्याचा उघड लिलाव पध्दतीने व्यापार सुरु केला. संपूर्ण भारतात सर्व प्रथम असा व्यापार सांगली येथे सुरु करणेचे कार्यज्ञत पुढाकार.व्यापा-यांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्यासाठी, व्यापारी वर्गात जागृती करण्यासाठी व्यापार विषयक नियतकालीकातून व वर्तमान पत्रातून सातत्याने लेखन. 1995 साली मार्केट अॅक्ट मध्ये शेतक-यांच्या पट्टीतील खर्चाबाबत शासनाने तो कायदा मागे घेतला. या कामी पूणे परिषद व सांगली शहर व्यापारात तीव्रता वाढवली.
मा. मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री श्री गोपिनाथ मुंडे यांचे बरोबर व्यापारी समस्याबाबत शासनाने व्यापार विषयक धोरण जाहीर करणेबाबत चर्चा केली.
सन 1992:- महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीज या संस्थेवर सांगली व सातारा विभागात अध्यक्ष म्हणून निवड
सन 1994:- महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स गव्हर्निंग कौन्सिलवर सदस्य म्हणून निवड.
मार्केट यार्डातील अडत व्यापा-यांची संघटना केली. 1989 साली संघटना स्थापना केली. दैनदिन हिषोबाबाबत अडचणी सोडविणेस या संघटनेचा मोलाचा वाटा.
सांगली शहरात वखारभाग येथे प्रवासी वाहतूक करणा-या ट्रॅक्स गाडयासाठी पार्किगची सोय करण्यात पुढाकार घेवून योजना तयार करुन मंजूर करुन घेतली.
सांगली शहरात दत्त मारुती रोड वरील अतिक्रमाणामुळे नागरिकांना होणारा त्रास थांबविण्यासाठी आंदोलन.
सन 1995:- रोटरी क्लब व व्यापारी मित्र यांचे संयुक्त विद्यमाने ज्ञान सत्र शिबीराचे आयोजन.
चेंबर भवन महावीरनगर येथे 5 लाख रु. खर्चाचा अत्याधुनिक सुविधा असलेला व अंदाजे 200 लोकांची व्यवस्था असू शकेल असा कोन्फेरंस हॉल.
बेदाण्यावरील जकात संपुर्ण माफ तसेच सोने चांदीवरील जकात कमी करणेबाबत यषस्वी प्रयत्न.
सन 1998:- राज्यस्तरीय व्यापारी परिषदेचे आयोजन स्थळ – राजमती भवन, सांगली
सन 1998:- उपाध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमेरसे अँड इंडस्ट्रीज, मुंबई
सन 1999:- सांगली जिल्हा इंटरनेट नोड कार्यान्वीत करणेत पुढाकार
मिरज पंढरपूर रोडवर 5000 एकरांची भव्य एम.आय.डी.सी. होणेसाठी गेले 5 वर्षे सातत्याने शासन दरबारी प्रयत्न. उद्योग मित्र परिषदेत उद्यसेगमंत्री लीळाधर डाके यांनी सांगली येथे ही एम.आय.डी.सी. करण्याचे जाहीर केली.
पुणे ते संकेष्वर पर्यंत पर्यायी महामार्गाची संकल्पना मांडली. पुणे, हडपसर, जेजूरी, फलटण, विटा, तासगांव, सांगली, मिरज, चिकोडी, संकेष्वर असा महामार्ग व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. शासनाने आष्वासन दिले आहे.